Self Studies

Marathi Test - 9

Result Self Studies

Marathi Test - 9
  • Score

    -

    out of -
  • Rank

    -

    out of -
TIME Taken - -
Self Studies

SHARING IS CARING

If our Website helped you a little, then kindly spread our voice using Social Networks. Spread our word to your readers, friends, teachers, students & all those close ones who deserve to know what you know now.

Self Studies Self Studies
Weekly Quiz Competition
  • Question 1
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्यायाची निवड करा.

    सारी पांगापांग झाली. सारे गेले, पण एक गेले नाही. माईचे फुलवेड! हे वेड नसते तर माई वेड्या झाल्या असत्या. माई लहानपणपासूनच फुलवेड्या होत्या. बालपणी माईच्या बाळडोळ्यांना आधी ओळख झाली असेल, पटली असेल, तर ती फुलांची. लहानपणी माई तासन् तास आपल्या बागेत हिंडायच्या, फुलांशी खेळायच्या, फुलांशी बोलायच्या. है फुलवेड घेऊनच माई सासरी गेल्या. घर भरलेले होते, पण माईंच लक्ष्य घराबाहेर बागेत होते. काकाजी पुढच्या बागेत खपत. माईंनी आपल्यासाठी मागच्या बाजूचा एक कोपरा मागून घेतला आणि त्यात आपली स्वतःची बाग थाटली. त्यांची आणि काकाजींची चढाओढ सुरू झाली. काकाजींच्या गुलाबापेक्षाही आपले गुलाब टपोरे झाले पाहिजेत म्हणून माईंची धडपड चाले. माईंनी लांबलांबून गुलाबाची रोपे आणली. कधी हे, कधी ते, असे खताचे प्रयोग केले. आपल्या गुलाबाला पांढरेशुभ्र, टपोरे फूल येताच माईंना ब्रह्मानंद झाला. ज्याला-त्याला आपल्या बागेत नेऊन त्या आपले फूल दाखवीत. लाडकी सून. साऱ्यांनी माईंचे कौतुक केले. ते पहिले फूल तोडल्यावर माईंनी "बघा माझा गुलाब" म्हणून ज्याला-त्याला आपले फूल दाखविले, इतकेच नव्हे, तर एक गंभीर प्रकृतीच्या, निर्विकार, निर्गुण डॉक्टरीणबाई वाड्यात आल्या होत्या. माईंनी त्यांच्या नाकाशी फूल नेले.

    माईंना सारीच फुले आवडत. त्यातल्या त्यात गुलाब हा त्यांचा विशेष आवडता. गुलाबांतही पांढरा आणि फिकट गुलाबी. गुलाबा-खालोखाल शेवंती, मोगरा आणि जुई. विलायती फुलांत डेलिया आणि ग्लॅडिओलस. माईंनी पाचपन्नास प्रकारचे डिलिये आणले, त्यांची लागवड केली. चांगली मशागत केली आणि त्यातून एकदोन जातींची निवड केली. माईंचे डेलिये इतके डेरेदार आणि डौलदार असत की त्यांच्याकडे पाहातच असावे. माईंना मारव्याची फार आवड. त्या मारव्याचा सारखा प्रचार करीत. त्या म्हणत, फुलझाडाला फूल येईपर्यंत तुम्हाला धीर निघत नसेल तर मारवा लावा. आठपंधरा दिवसांत जीव धरील. छानदार मरवा तुम्हाला वास घ्यायला मिळेल.

    वाडा विकला तेव्हा माई रात्रभर रडल्या, पण सकाळी आपल्या बागेकडे पाहून स्वस्थ झाल्या. आता त्यांची बाग म्हणजे फुलझाडांच्या चार कुंड्या होत्या. त्या कुंड्यांना त्या जिवापलिकडे जपत. त्या जिकडे जात तिकडे त्यांच्या बरोबर त्यांची ही छोटी बागही जात असे. माईंच्या पायाला भोवरा असे. त्या कधी महिना-दीड-महिना एका ठिकाणी स्वस्थ राहिल्या नाहीत. कधी पुण्याला, कधी नाशकाला. तर कधी नगरला. बरोबर नेहमी त्या चार कुंड्या. पुण्यास लेकीकडे आल्या म्हणजे आधी आपल्या कुंड्यांची सोय लावायच्या, मग स्वतःची. सकाळी उठल्या की माझ्या बागेत येत. आपल्या जुन्या ओळखीच्या झाडांची, रोपांची भेट घेत, माळ्याला त्याची ख्याली-खुशाली विचारीत, आणि मगच घरात येऊन मला भेटत.

    ...view full instructions

    माईंना कोणत्या गोष्टीमुळे ब्रह्मानंद झाला?
    Solution

    स्पष्टीकरण: 

    • प्रस्तुत उताऱ्यात ‘माई' नामक व्यक्तिरेखा व त्यांचे फुलांबद्दलचे प्रेम ह्याविषयी सांगितले आहे. 
    • माईना त्यांच्या लहानपणापासूनच फुलांची अत्यंत आवड होती. लग्नानंतर ही त्यांनी वाड्यात एक छोटीशी जागा त्यासाठी मागून घेतली होती व स्वतःची बाग सजवली. 
    • माई यांचा त्यांच्या बागेतील फुलांवर विशेष जीव होता. त्यात ही त्यांना पांढरट गुलाबी रंगांच्या गुलाबांची आवड होती. आपलीच फुले अधिक सुंदर व बहारदार दिसावी यासाठी त्यांची काकांसोबत कायम चढाओढ असे.
    • त्यांनी अनेक प्रयोग केले, विविध खाते वापरली, बागेत खपल्या व शेवटी त्यांच्या गुलाबाला पांढरेशुभ्र, टपोरे फूल येताच माईंना ब्रह्मानंद झाला.

    Important Pointsब्रम्हानंद-  आत्यंतिक आनंद होणे

  • Question 2
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्यायाची निवड करा.

    सारी पांगापांग झाली. सारे गेले, पण एक गेले नाही. माईचे फुलवेड! हे वेड नसते तर माई वेड्या झाल्या असत्या. माई लहानपणपासूनच फुलवेड्या होत्या. बालपणी माईच्या बाळडोळ्यांना आधी ओळख झाली असेल, पटली असेल, तर ती फुलांची. लहानपणी माई तासन् तास आपल्या बागेत हिंडायच्या, फुलांशी खेळायच्या, फुलांशी बोलायच्या. है फुलवेड घेऊनच माई सासरी गेल्या. घर भरलेले होते, पण माईंच लक्ष्य घराबाहेर बागेत होते. काकाजी पुढच्या बागेत खपत. माईंनी आपल्यासाठी मागच्या बाजूचा एक कोपरा मागून घेतला आणि त्यात आपली स्वतःची बाग थाटली. त्यांची आणि काकाजींची चढाओढ सुरू झाली. काकाजींच्या गुलाबापेक्षाही आपले गुलाब टपोरे झाले पाहिजेत म्हणून माईंची धडपड चाले. माईंनी लांबलांबून गुलाबाची रोपे आणली. कधी हे, कधी ते, असे खताचे प्रयोग केले. आपल्या गुलाबाला पांढरेशुभ्र, टपोरे फूल येताच माईंना ब्रह्मानंद झाला. ज्याला-त्याला आपल्या बागेत नेऊन त्या आपले फूल दाखवीत. लाडकी सून. साऱ्यांनी माईंचे कौतुक केले. ते पहिले फूल तोडल्यावर माईंनी "बघा माझा गुलाब" म्हणून ज्याला-त्याला आपले फूल दाखविले, इतकेच नव्हे, तर एक गंभीर प्रकृतीच्या, निर्विकार, निर्गुण डॉक्टरीणबाई वाड्यात आल्या होत्या. माईंनी त्यांच्या नाकाशी फूल नेले.

    माईंना सारीच फुले आवडत. त्यातल्या त्यात गुलाब हा त्यांचा विशेष आवडता. गुलाबांतही पांढरा आणि फिकट गुलाबी. गुलाबा-खालोखाल शेवंती, मोगरा आणि जुई. विलायती फुलांत डेलिया आणि ग्लॅडिओलस. माईंनी पाचपन्नास प्रकारचे डिलिये आणले, त्यांची लागवड केली. चांगली मशागत केली आणि त्यातून एकदोन जातींची निवड केली. माईंचे डेलिये इतके डेरेदार आणि डौलदार असत की त्यांच्याकडे पाहातच असावे. माईंना मारव्याची फार आवड. त्या मारव्याचा सारखा प्रचार करीत. त्या म्हणत, फुलझाडाला फूल येईपर्यंत तुम्हाला धीर निघत नसेल तर मारवा लावा. आठपंधरा दिवसांत जीव धरील. छानदार मरवा तुम्हाला वास घ्यायला मिळेल.

    वाडा विकला तेव्हा माई रात्रभर रडल्या, पण सकाळी आपल्या बागेकडे पाहून स्वस्थ झाल्या. आता त्यांची बाग म्हणजे फुलझाडांच्या चार कुंड्या होत्या. त्या कुंड्यांना त्या जिवापलिकडे जपत. त्या जिकडे जात तिकडे त्यांच्या बरोबर त्यांची ही छोटी बागही जात असे. माईंच्या पायाला भोवरा असे. त्या कधी महिना-दीड-महिना एका ठिकाणी स्वस्थ राहिल्या नाहीत. कधी पुण्याला, कधी नाशकाला. तर कधी नगरला. बरोबर नेहमी त्या चार कुंड्या. पुण्यास लेकीकडे आल्या म्हणजे आधी आपल्या कुंड्यांची सोय लावायच्या, मग स्वतःची. सकाळी उठल्या की माझ्या बागेत येत. आपल्या जुन्या ओळखीच्या झाडांची, रोपांची भेट घेत, माळ्याला त्याची ख्याली-खुशाली विचारीत, आणि मगच घरात येऊन मला भेटत.

    ...view full instructions

    माईंना गुलाबाच्या फुलानंतर कोणते देशी फूल आवडत असे? 
    Solution

    स्पष्टीकरण: प्रस्तुत गद्यांशात ‘माई' नामक व्यक्तिरेखा व त्यांचे फुलांबद्दलचे प्रेम ह्याविषयी सांगितले आहे.

    माई ह्यांना फुलांचे विशेषतः गुलाबाच्या फुलांचे वेड होते. त्याच खालोखाल त्यांना जुई, शेवंता व मोगरा ही देशी फुलेही आवडत असत.

  • Question 3
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्यायाची निवड करा.

    सारी पांगापांग झाली. सारे गेले, पण एक गेले नाही. माईचे फुलवेड! हे वेड नसते तर माई वेड्या झाल्या असत्या. माई लहानपणपासूनच फुलवेड्या होत्या. बालपणी माईच्या बाळडोळ्यांना आधी ओळख झाली असेल, पटली असेल, तर ती फुलांची. लहानपणी माई तासन् तास आपल्या बागेत हिंडायच्या, फुलांशी खेळायच्या, फुलांशी बोलायच्या. है फुलवेड घेऊनच माई सासरी गेल्या. घर भरलेले होते, पण माईंच लक्ष्य घराबाहेर बागेत होते. काकाजी पुढच्या बागेत खपत. माईंनी आपल्यासाठी मागच्या बाजूचा एक कोपरा मागून घेतला आणि त्यात आपली स्वतःची बाग थाटली. त्यांची आणि काकाजींची चढाओढ सुरू झाली. काकाजींच्या गुलाबापेक्षाही आपले गुलाब टपोरे झाले पाहिजेत म्हणून माईंची धडपड चाले. माईंनी लांबलांबून गुलाबाची रोपे आणली. कधी हे, कधी ते, असे खताचे प्रयोग केले. आपल्या गुलाबाला पांढरेशुभ्र, टपोरे फूल येताच माईंना ब्रह्मानंद झाला. ज्याला-त्याला आपल्या बागेत नेऊन त्या आपले फूल दाखवीत. लाडकी सून. साऱ्यांनी माईंचे कौतुक केले. ते पहिले फूल तोडल्यावर माईंनी "बघा माझा गुलाब" म्हणून ज्याला-त्याला आपले फूल दाखविले, इतकेच नव्हे, तर एक गंभीर प्रकृतीच्या, निर्विकार, निर्गुण डॉक्टरीणबाई वाड्यात आल्या होत्या. माईंनी त्यांच्या नाकाशी फूल नेले.

    माईंना सारीच फुले आवडत. त्यातल्या त्यात गुलाब हा त्यांचा विशेष आवडता. गुलाबांतही पांढरा आणि फिकट गुलाबी. गुलाबा-खालोखाल शेवंती, मोगरा आणि जुई. विलायती फुलांत डेलिया आणि ग्लॅडिओलस. माईंनी पाचपन्नास प्रकारचे डिलिये आणले, त्यांची लागवड केली. चांगली मशागत केली आणि त्यातून एकदोन जातींची निवड केली. माईंचे डेलिये इतके डेरेदार आणि डौलदार असत की त्यांच्याकडे पाहातच असावे. माईंना मारव्याची फार आवड. त्या मारव्याचा सारखा प्रचार करीत. त्या म्हणत, फुलझाडाला फूल येईपर्यंत तुम्हाला धीर निघत नसेल तर मारवा लावा. आठपंधरा दिवसांत जीव धरील. छानदार मरवा तुम्हाला वास घ्यायला मिळेल.

    वाडा विकला तेव्हा माई रात्रभर रडल्या, पण सकाळी आपल्या बागेकडे पाहून स्वस्थ झाल्या. आता त्यांची बाग म्हणजे फुलझाडांच्या चार कुंड्या होत्या. त्या कुंड्यांना त्या जिवापलिकडे जपत. त्या जिकडे जात तिकडे त्यांच्या बरोबर त्यांची ही छोटी बागही जात असे. माईंच्या पायाला भोवरा असे. त्या कधी महिना-दीड-महिना एका ठिकाणी स्वस्थ राहिल्या नाहीत. कधी पुण्याला, कधी नाशकाला. तर कधी नगरला. बरोबर नेहमी त्या चार कुंड्या. पुण्यास लेकीकडे आल्या म्हणजे आधी आपल्या कुंड्यांची सोय लावायच्या, मग स्वतःची. सकाळी उठल्या की माझ्या बागेत येत. आपल्या जुन्या ओळखीच्या झाडांची, रोपांची भेट घेत, माळ्याला त्याची ख्याली-खुशाली विचारीत, आणि मगच घरात येऊन मला भेटत.

    ...view full instructions

    माई सासरी काय घेऊन गेल्या?
    Solution

    स्पष्टीकरण:  प्रस्तुत उताऱ्यात ‘माई' नामक व्यक्तिरेखा व त्यांचे फुलांबद्दलचे प्रेम ह्याविषयी सांगितले आहे. 

    माईंना त्यांच्या लहानपणापासूनच फुलांची अत्यंत आवड होती. माई आपला अख्खा दिवस हा बागेत घालवायच्या, कधी त्या फुलांशी हितगुज करीत तर कधी तासनतास त्या बागेत हिंडत व खेळत. बालपणापासून त्यांचे हे फुलांवरचे प्रेम हे आत्यंतिक असल्याने त्यांना फूलवेड होते असे म्हटले आहे. हेच त्यांचे फूलवेड घेऊन त्या सासरी गेल्या व तिथेसुद्धा त्यांनी स्वतःची बाग सजवली. 

    अशाप्रकारे माई स्वतःसोबत सासरी स्वतःचे फूलवेड घेऊन गेल्या.

  • Question 4
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्यायाची निवड करा.

    सारी पांगापांग झाली. सारे गेले, पण एक गेले नाही. माईचे फुलवेड! हे वेड नसते तर माई वेड्या झाल्या असत्या. माई लहानपणपासूनच फुलवेड्या होत्या. बालपणी माईच्या बाळडोळ्यांना आधी ओळख झाली असेल, पटली असेल, तर ती फुलांची. लहानपणी माई तासन् तास आपल्या बागेत हिंडायच्या, फुलांशी खेळायच्या, फुलांशी बोलायच्या. है फुलवेड घेऊनच माई सासरी गेल्या. घर भरलेले होते, पण माईंच लक्ष्य घराबाहेर बागेत होते. काकाजी पुढच्या बागेत खपत. माईंनी आपल्यासाठी मागच्या बाजूचा एक कोपरा मागून घेतला आणि त्यात आपली स्वतःची बाग थाटली. त्यांची आणि काकाजींची चढाओढ सुरू झाली. काकाजींच्या गुलाबापेक्षाही आपले गुलाब टपोरे झाले पाहिजेत म्हणून माईंची धडपड चाले. माईंनी लांबलांबून गुलाबाची रोपे आणली. कधी हे, कधी ते, असे खताचे प्रयोग केले. आपल्या गुलाबाला पांढरेशुभ्र, टपोरे फूल येताच माईंना ब्रह्मानंद झाला. ज्याला-त्याला आपल्या बागेत नेऊन त्या आपले फूल दाखवीत. लाडकी सून. साऱ्यांनी माईंचे कौतुक केले. ते पहिले फूल तोडल्यावर माईंनी "बघा माझा गुलाब" म्हणून ज्याला-त्याला आपले फूल दाखविले, इतकेच नव्हे, तर एक गंभीर प्रकृतीच्या, निर्विकार, निर्गुण डॉक्टरीणबाई वाड्यात आल्या होत्या. माईंनी त्यांच्या नाकाशी फूल नेले.

    माईंना सारीच फुले आवडत. त्यातल्या त्यात गुलाब हा त्यांचा विशेष आवडता. गुलाबांतही पांढरा आणि फिकट गुलाबी. गुलाबा-खालोखाल शेवंती, मोगरा आणि जुई. विलायती फुलांत डेलिया आणि ग्लॅडिओलस. माईंनी पाचपन्नास प्रकारचे डिलिये आणले, त्यांची लागवड केली. चांगली मशागत केली आणि त्यातून एकदोन जातींची निवड केली. माईंचे डेलिये इतके डेरेदार आणि डौलदार असत की त्यांच्याकडे पाहातच असावे. माईंना मारव्याची फार आवड. त्या मारव्याचा सारखा प्रचार करीत. त्या म्हणत, फुलझाडाला फूल येईपर्यंत तुम्हाला धीर निघत नसेल तर मारवा लावा. आठपंधरा दिवसांत जीव धरील. छानदार मरवा तुम्हाला वास घ्यायला मिळेल.

    वाडा विकला तेव्हा माई रात्रभर रडल्या, पण सकाळी आपल्या बागेकडे पाहून स्वस्थ झाल्या. आता त्यांची बाग म्हणजे फुलझाडांच्या चार कुंड्या होत्या. त्या कुंड्यांना त्या जिवापलिकडे जपत. त्या जिकडे जात तिकडे त्यांच्या बरोबर त्यांची ही छोटी बागही जात असे. माईंच्या पायाला भोवरा असे. त्या कधी महिना-दीड-महिना एका ठिकाणी स्वस्थ राहिल्या नाहीत. कधी पुण्याला, कधी नाशकाला. तर कधी नगरला. बरोबर नेहमी त्या चार कुंड्या. पुण्यास लेकीकडे आल्या म्हणजे आधी आपल्या कुंड्यांची सोय लावायच्या, मग स्वतःची. सकाळी उठल्या की माझ्या बागेत येत. आपल्या जुन्या ओळखीच्या झाडांची, रोपांची भेट घेत, माळ्याला त्याची ख्याली-खुशाली विचारीत, आणि मगच घरात येऊन मला भेटत.

    ...view full instructions

    माई कोणत्या गोष्टीचा सारखा प्रचार करीत असत?
    Solution

    स्पष्टीकरण: प्रस्तुत उताऱ्यात ‘माई' नामक व्यक्तिरेखा व त्यांचे फुलांबद्दलचे प्रेम ह्याविषयी सांगितले आहे. 

    माईंना सारीच फूले आवडत असत. गुलाब त्या खालोखाल शेवंता, मोगरा, जुई तसेच विदेशी फूलांमध्ये डेलिया आणि ग्लॅडिओलस ही सुद्धा फुले आवडत सोबतच त्यांना मरव्याची फुले देखील अत्यंत प्रिय होती; त्याला कारण ही तसेच होते. 

    त्या सारख्या मरव्याचा प्रचार करीत, त्या म्हणत, फुलझाडाला फूल येईपर्यंत तुम्हाला धीर निघत नसेल तर मरवा लावा, ८-१० दिवसांत ते छान तग धरेल व त्याला फुले येतील.

    Additional Informationमरव्याची फूले- मरवा ही सुगंधी बहुवर्षायू वनस्पती लॅमिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ऑरिगॅनम मॅजोरॅना आहे. ती मॅजोरॅना हॉर्टेन्सिस या शास्त्रीय नावानेही ओळखली जाते. ती मूळची दक्षिण यूरोप व उत्तर आफ्रिका येथील असून ती भारतात बागेमध्ये वाढविली जाते. मरवा वनस्पतीचे खोड शाखित असून ती ३०–६० सेंमी. उंच वाढते. पाने साधी, राखट हिरवी, लहान व सुगंधी असतात. फुले पांढरट किंवा जांभळ्या रंगाची असून ती गुच्छात येतात. हे गुच्छ शेंड्याकडे येतात. फुलांची रचना तुळशीच्या कुलातील सब्जा व पुदिना या वनस्पतींसारखी असते. बिया अनेक व लहान असून त्यांचा रंग गर्द तपकिरी असतो. त्यांत तेल असते.

  • Question 5
    5 / -1

    Directions For Questions

    निर्देश: पुढील उतारा वाचा आणि खालील प्रश्नांसाठी योग्य पर्यायाची निवड करा.

    सारी पांगापांग झाली. सारे गेले, पण एक गेले नाही. माईचे फुलवेड! हे वेड नसते तर माई वेड्या झाल्या असत्या. माई लहानपणपासूनच फुलवेड्या होत्या. बालपणी माईच्या बाळडोळ्यांना आधी ओळख झाली असेल, पटली असेल, तर ती फुलांची. लहानपणी माई तासन् तास आपल्या बागेत हिंडायच्या, फुलांशी खेळायच्या, फुलांशी बोलायच्या. है फुलवेड घेऊनच माई सासरी गेल्या. घर भरलेले होते, पण माईंच लक्ष्य घराबाहेर बागेत होते. काकाजी पुढच्या बागेत खपत. माईंनी आपल्यासाठी मागच्या बाजूचा एक कोपरा मागून घेतला आणि त्यात आपली स्वतःची बाग थाटली. त्यांची आणि काकाजींची चढाओढ सुरू झाली. काकाजींच्या गुलाबापेक्षाही आपले गुलाब टपोरे झाले पाहिजेत म्हणून माईंची धडपड चाले. माईंनी लांबलांबून गुलाबाची रोपे आणली. कधी हे, कधी ते, असे खताचे प्रयोग केले. आपल्या गुलाबाला पांढरेशुभ्र, टपोरे फूल येताच माईंना ब्रह्मानंद झाला. ज्याला-त्याला आपल्या बागेत नेऊन त्या आपले फूल दाखवीत. लाडकी सून. साऱ्यांनी माईंचे कौतुक केले. ते पहिले फूल तोडल्यावर माईंनी "बघा माझा गुलाब" म्हणून ज्याला-त्याला आपले फूल दाखविले, इतकेच नव्हे, तर एक गंभीर प्रकृतीच्या, निर्विकार, निर्गुण डॉक्टरीणबाई वाड्यात आल्या होत्या. माईंनी त्यांच्या नाकाशी फूल नेले.

    माईंना सारीच फुले आवडत. त्यातल्या त्यात गुलाब हा त्यांचा विशेष आवडता. गुलाबांतही पांढरा आणि फिकट गुलाबी. गुलाबा-खालोखाल शेवंती, मोगरा आणि जुई. विलायती फुलांत डेलिया आणि ग्लॅडिओलस. माईंनी पाचपन्नास प्रकारचे डिलिये आणले, त्यांची लागवड केली. चांगली मशागत केली आणि त्यातून एकदोन जातींची निवड केली. माईंचे डेलिये इतके डेरेदार आणि डौलदार असत की त्यांच्याकडे पाहातच असावे. माईंना मारव्याची फार आवड. त्या मारव्याचा सारखा प्रचार करीत. त्या म्हणत, फुलझाडाला फूल येईपर्यंत तुम्हाला धीर निघत नसेल तर मारवा लावा. आठपंधरा दिवसांत जीव धरील. छानदार मरवा तुम्हाला वास घ्यायला मिळेल.

    वाडा विकला तेव्हा माई रात्रभर रडल्या, पण सकाळी आपल्या बागेकडे पाहून स्वस्थ झाल्या. आता त्यांची बाग म्हणजे फुलझाडांच्या चार कुंड्या होत्या. त्या कुंड्यांना त्या जिवापलिकडे जपत. त्या जिकडे जात तिकडे त्यांच्या बरोबर त्यांची ही छोटी बागही जात असे. माईंच्या पायाला भोवरा असे. त्या कधी महिना-दीड-महिना एका ठिकाणी स्वस्थ राहिल्या नाहीत. कधी पुण्याला, कधी नाशकाला. तर कधी नगरला. बरोबर नेहमी त्या चार कुंड्या. पुण्यास लेकीकडे आल्या म्हणजे आधी आपल्या कुंड्यांची सोय लावायच्या, मग स्वतःची. सकाळी उठल्या की माझ्या बागेत येत. आपल्या जुन्या ओळखीच्या झाडांची, रोपांची भेट घेत, माळ्याला त्याची ख्याली-खुशाली विचारीत, आणि मगच घरात येऊन मला भेटत.

    ...view full instructions

    'चढाओढ' या शब्दातून लेखकाला कोणता अर्थ अभिप्रेत नाही?
    Solution

    स्पष्टीकरण: प्रस्तुत गद्यांशात ‘माई' नामक व्यक्तिरेखा व त्यांचे फुलांबद्दलचे प्रेम ह्याविषयी सांगितले आहे.

    माई सासरी येताना सोबत फूलप्रेम घेऊन आल्या. घर भरलेले होते तरीदेखील त्यांचे संपुर्ण लक्ष हे बागेतच लागून राहायचे. समोरची बाग हे त्यांचे पती सांभाळायचे. शेवटी माईंनी मागच्या बाजूचा एक कोपरा मागून घेतला आणि त्यात आपली स्वतःची बाग थाटली.

    आपल्या पतीने लावलेल्या गुलाबापेक्षाही आपले गुलाब टपोरे झाले पाहिजेत म्हणून माईंची धडपड चालायची व त्या दोघांत यावरून चढाओढ सुरु व्हायची.

    प्रस्तुत उताऱ्यात चढाओढ हा अर्थ स्पर्धा, चुरस व लालसा या अर्थाने आलेला आहे. त्यांच्यात ती स्पर्धा असली तरीही त्यात ईर्षा कुठेच नव्हती. कारण माईंचे प्रेम हे सर्व फुलांवर सारखेच होते.

    अशाप्रकारे लेखकाला 'चढाओढ' या शब्दातून ईर्षा हा अर्थ अभिप्रेत नाही.

  • Question 6
    5 / -1

    Directions For Questions

    वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यांत विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो, ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते बाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरांत राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून? आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला; पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत.

    आता माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो, वेळ थोडा असतो. कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा  एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला, जीवनाची ही टोके सांधणार कशी? जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यांत निदान शंभर मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसामाणसांत दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोषी असते.

    ...view full instructions

    प्रस्तुत उताऱ्यात कशाचे महत्त्व सांगितले आहे?
    Solution
    प्रस्तुत उतारा हा प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या प्रसिद्ध पुस्तकातून घेण्यात आला आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज आहेच परंतु गरज नसतांना खोट्या प्रतिष्ठेपायी नको तितक्या वेगाने वाहने चालविण्याचे दुष्परिणाम यात लेखकाने मांडले आहेत. 
    प्रस्तुत उताऱ्यात लेखक सतत गती या शब्दाचा उल्लेख करतो. योग्य गती माणसाला कशी योग्य दिशेकडे नेते आणि दिशाहीन गती कसे मनुष्याचे नुकसान करते याचा आढावा यात घेण्यात आलेला आहे.
    त्यामुळे गतीचे महत्त्व प्रस्तुत उताऱ्यात सांगितले आहे.
  • Question 7
    5 / -1

    Directions For Questions

    वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यांत विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो, ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते बाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरांत राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून? आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला; पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत.

    आता माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो, वेळ थोडा असतो. कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा  एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला, जीवनाची ही टोके सांधणार कशी? जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यांत निदान शंभर मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसामाणसांत दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोषी असते.

    ...view full instructions

    कशाप्रकारची गती ही विकृती आहे?
    Solution

    प्रस्तुत उतारा हा प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या प्रसिद्ध पुस्तकातून घेण्यात आला आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज आहेच परंतु गरज नसतांना खोट्या प्रतिष्ठेपायी नको तितक्या वेगाने वाहने चालविण्याचे दुष्परिणाम यात लेखकाने मांडले आहेत. 

    प्रस्तुत उताऱ्यात लेखक सतत गती या शब्दाचा उल्लेख करतो. योग्य गती माणसाला कशी योग्य दिशेकडे नेते आणि दिशाहीन गती कसे मनुष्याचे नुकसान करते याचा आढावा यात घेण्यात आलेला आहे.
    लेखक म्हणतात की दूरदूरचे अंतर गाठण्यासाठी गती ही आवश्यकच आहे. तिची मदत घ्यावीच लागते परंतु अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही विकृती आहे जी केवळ मनुष्याचे नुकसानच करेल.

  • Question 8
    5 / -1

    Directions For Questions

    वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यांत विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो, ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते बाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरांत राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून? आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला; पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत.

    आता माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो, वेळ थोडा असतो. कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा  एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला, जीवनाची ही टोके सांधणार कशी? जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यांत निदान शंभर मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसामाणसांत दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोषी असते.

    ...view full instructions

     वेगाचा आश्रय का घेतला जातो?
    Solution
    प्रस्तुत उतारा हा प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या प्रसिद्ध पुस्तकातून घेण्यात आला आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज आहेच परंतु गरज नसतांना खोट्या प्रतिष्ठेपायी नको तितक्या वेगाने वाहने चालविण्याचे दुष्परिणाम यात लेखकाने मांडले आहेत. 
    लेखक म्हणतात की, आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा. त्याहून अति वेग हा मनुष्याला घातक ठरतो. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसामाणसांत दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. 
    अशाप्रकारे माणसामाणसातील दुरावा संपुष्टात आणण्यासाठी वेगाचा आश्रय घेतला जातो. 
  • Question 9
    5 / -1

    Directions For Questions

    वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यांत विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो, ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते बाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरांत राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून? आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला; पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत.

    आता माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो, वेळ थोडा असतो. कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा  एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला, जीवनाची ही टोके सांधणार कशी? जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यांत निदान शंभर मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसामाणसांत दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोषी असते.

    ...view full instructions

    जीवनाची ही टोके साधणार कशी? वाक्यप्रकार ओळखा.
    Solution

    वाक्याचे पाच प्रकार होतात.

    1. होकारार्थी 
    2. प्रश्नार्थी
    3. विधानार्थी
    4. नकारार्थी
    5. उद्गारार्थी

    Important Pointsप्रश्नार्थी- नेहमीच्या व्यवहारात आपण अनेक प्रश्न विचारतो. काय, कुठे, कसे, का हे शब्द जेव्हा वाक्यात येतात तेव्हा ते प्रश्नार्थी वाक्य होते.
    उदा.

    • तु कुठे चाललास?
    • तुला जाता येते का?
    • आता प्रकृती कशी आहे?

    अशाप्रकारे जीवनाची ही टोके साधणार कशी? हे वाक्य देखील प्रश्नार्थी आहे.

    Additional Information

    • विधानार्थी- ज्यात केवळ विधान केलेले असते.उदा. मी जात आहे. 
    • होकारार्थी- सकारात्मक उत्तर मिळणारे वाक्य म्हणजे होकारार्थी वाक्य होय. उदा. पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे.
    • नकारार्थी- यात होकारार्थी च्या विरुद्धार्थी शब्द घेऊन वाक्य लिहिल्या जाते. उदा. पाचशे रुपये ही रक्कम काही लहान नव्हे.
    • उद्गारार्थी- मनातील तीव्र इच्छा व्यक्त करतांना उद्गारार्थी वाक्य वापरले जाते. उदा. केवढी उंच इमारत ही!
  • Question 10
    5 / -1

    Directions For Questions

    वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यांत विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो, ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते बाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरांत राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून? आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला; पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत.

    आता माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो, वेळ थोडा असतो. कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा  एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला, जीवनाची ही टोके सांधणार कशी? जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यांत निदान शंभर मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसामाणसांत दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोषी असते.

    ...view full instructions

    वेगात एक बेहोषी असते. या वाक्यातील बेहोशी असणे या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करा.
    Solution
    वाक्प्रचार: शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला ‘वाक्प्रचार’ असे म्हणतात.
    वेगात एक बेहोषी असते या वाक्यातील बेहोषी असणे याचा अर्थ धुंदी चढणे हा योग्य आहे. कारण वाहने चालविताना लोक सहसा भान हरपून अगदी गतीने वाहने चालवितात त्यामुळे एकप्रकारची गतीची धुंदी त्यांना चढते.
    उदा. पं. भीमसेन जोशींच्या गायनात एक बेहोषी असते.
Self Studies
User
Question Analysis
  • Correct -

  • Wrong -

  • Skipped -

My Perfomance
  • Score

    -

    out of -
  • Rank

    -

    out of -
Re-Attempt Weekly Quiz Competition
Self Studies Get latest Exam Updates
& Study Material Alerts!
No, Thanks
Self Studies
Click on Allow to receive notifications
Allow Notification
Self Studies
Self Studies Self Studies
To enable notifications follow this 2 steps:
  • First Click on Secure Icon Self Studies
  • Second click on the toggle icon
Allow Notification
Get latest Exam Updates & FREE Study Material Alerts!
Self Studies ×
Open Now