निर्देश: पुढील उतारावाचुन त्यावर आधारित 1 ते 5 प्रश्नांची उत्तरे द्या:
प्राचीन भारतीय इतिहासाचे शिक्षण, जे घरांमध्येही संस्कृत सहितांद्वारे झाले, मध्ययुगीन भक्ती काव्य, आणि आधुनिक भारतीय आणि यूरोपीय विचार आणि तत्त्वज्ञान, यामुळे जी पीडी यांनी ज्ञानाच्या सीमा अत्यंत ऐटबाजपणे ओलांडल्या आणि खरोखरच एका मुक्ततेने त्यांनी ते केले. सांस्कृतिक, साहित्यिक आणि नाटक या जगामधून त्यांना आदराने गोपू असे संबोधले जात असे, मराठी नाटककार म्हणून त्यांची उंची, मराठी आणि भारतीय नाटकाच्या प्रेक्षकांसमोर त्यांच्या पहिल्या नाटकाद्वारे ज्याला "चर्चा नाट्य" असे म्हंटले जाते त्यातून समोर आली. त्यांनी आधुनिक नाटक निर्माण केले, ज्यांमध्ये आपल्या आयुष्यात राजकारण कोणत्या मार्गाने प्रवेश करते आणि त्याद्वारे त्याला कसा आकार देते याचा शोध घेतला गेला.
त्यांचे पहिले नाटक, "उद्ध्वस्त धर्मशाळा" (जे योग्यरीतीने विद्यापीठात घडते), त्यांचे पहिले वाचन थिएटर अकादमीच्या पुण्याच्या कार्यशाळेत झाले होते जी दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांनी सन 1973 मध्ये आयोजित केली होती. डॉक्टर श्रीराम लागू यांनी त्याची निर्मिती केली होती, आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाची भूमिकाही त्यात केली होती. हे सर्व सर्जनात्मक मैत्री संबंध होते ते पुढे अनेक दशके चालले. उद्ध्वस्त धर्मशाळाचे अनेक प्रयोग वेगवेगळ्या निर्मिती संस्थाद्वारा संपूर्ण देशात झाले. दुबे यांनी गोपू यांची तीन नाटके दिग्दर्शित केली: अंधार यात्रा, चाणक्य विष्णुगुप्त, आणि रस्ते.
सन 1992 मध्ये, गोपुंनी त्यांनी श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोज या दूरदर्शन मालिकेसाठी लिहिलेला एक भाग नाट्य मंचाकरिता, ज्योतिराव फुले यांच्यावरील सत्यशोधक या चरित्रात्मक नाटकात रूपांतरित केला. जेव्हा तरुण साम्यवादी नाटक कार्यकर्ते सफदर हश्मी यांनी त्यांना शोधले तेव्हा त्यांचा जनम बरोबरील संवाद सुरू झाला आणि हश्मी यांच्या हत्येनंतर, गोपू सहमत या संस्थेच्या संस्थापक-ट्रस्टी पैकी एक होते. सत्यशोधक या नाटकाचा पुन्हा प्रयोग अतुल पेठे यांनी केला, ज्यांमध्ये पुणे महानगरपालिकेतील सांडपाणी कामगार युनियनचे कलाकार होते. या निर्मितीने महाराष्ट्रात वादळी प्रयोग केले, एका वर्षात 103 प्रयोग केले. यात काही आश्चर्य नाही की त्यांना अनेक मानसन्मान मिळाले, ज्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार आहे, आणि नुकताच मिळालेला तन्वीर सन्मान आहे.